Saturday, January 15, 2022

उडान...

      एक राजा आपल्या सुखी राज्यामध्ये फेरफटका मारत असताना त्याला बाजारात दोन गरुडाची पिल्ले विकायला बसलेला कुबड आलेला, कपाळावर सुरकुत्या ,झिरझिरीत धोतर आणि त्यावर मुंडे असा त्याचा पेहेराव असलेला गरीब म्हातारा दिसला. राजाना पाहताच त्याने मुजरा केला, तसा राजा त्याच्याकडेच येत होता कारण त्याला ते दोन गरुड पक्षी खूप आवडले होते. राजाने त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या आणि ते दोन पक्षी घेऊन गेला.

    राजाने त्या दोन गरुड पक्ष्यांच्या संगोपनाची जबाबदारी एका उत्तम व्यक्तीकडे सोपवली होती. दोनही पक्षी दिसायला खूपच मस्त होती. बघता बघता दोन्ही गरुड मोठे झाले आणि अगोदर पेक्षा खुपच सुंदर दिसू लागले.

     जेव्हा राजाला वाटले की दोन्ही गरूड दिसायला तर छानच आहेत पण आज त्यांची गरुडझेप पन पाहून बघुया म्हणून त्याने सेवकास सांगून गरुडाना मोकळे सोडले. तशी ती दोन्ही गरूडे आकाशात झेप घेतली. एक उंचच उंच गेला तर एकाने काही अंतरावर जाऊन परत एका फांदीवर येऊन बसला.


     खूप जण आले आणि प्रयत्न केले त्या गरुडाला उडण्यासाठी पण तो काही उंच जायचा आणि परत त्याच फांदीवर येऊन बसायचा. आता मात्र राजाला काही समजेना दोघंही एकत्र मोठी झाली पण एक असा आणि एक असा....कस काय शक्य आहे.

अस म्हणून त्याने दवंडी पेटवली की..जो कोणी या गरुडाला आकाशात उडवून दाखवेल त्याला 50 सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्या जातील.खूप हुशार, चतुर, पराक्रमी ईत्यादी व्यक्तीनी प्रयास करून सुद्धा जैसे थे व्हायचे. जरा उंच जायचा आणि परत येऊन त्या फांदीवर तो बसायचा आणि पहिला गरुड मात्र उंच आकाशात जाऊन पतंगाप्रमाणे नाहीसा व्हायचा.

     हे सर्व अस होत असताना राजा मात्र नाराज होऊन आपल्या महालात निघून गेला. काही काळ गेल्यावर एक सेवक धापा टाकत आला आणि राजाला आनंदाने सांगू लागला... आपला तो तो...आपला तो... अरे काय आपला तो असे राजा विचारताच त्याने सांगितले की दुसर्‍या गरुडाने सुद्धा आकाशात भरारी घेतली.

यावर राजा खुश झाला आणि ज्याने कोणी हा पराक्रम केला त्याला उद्या सभेत हजर राहण्यास सांगितले. 

सभा भरली ,समोर एक वृद्ध शेतकरी उभा होता, ज्याच्या कडून राजाने पिल्ले लहान असताना घेतली होती. राजाने त्या शेतकर्‍याला सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्या. आणि विचारू लागला जे दुसरे कोणीच करू शकले नाही ते तू कस काय केलंस...?

त्यावर तो उत्तरला,...महाराज मी बस् पाहत होतो तो गरुड यायचा आणि त्या फांदीवर बसायचा. म्हणून मी ती फक्त झाडाची फांदीच तोडून टाकली. त्यावर तो गरुड देखील आपल्या साथीदारांसह आकाशात भरारी घेऊ लागला.....यावर सर्व दरबार वाहवा करू लागला.

तात्पर्य काय?  तर, आपण देखील आपल्या मध्ये असणार्‍या गुणवत्ता, क्षमतेच्या जोरावर न जाता,आहे तेवढ्यातच समाधानी राहण्याचा विचार करत असतो. म्हणजेच तसच की म्हणतात ना"सरड्याची धाव कुंपणापर्यंत" याला अनुसरून वागत आहोत पण आतून आहोत खूप ध्येयाने वेडे.

आपल्यातील काही विद्यार्थी पण तसेच आहेत वर्गात, शाळेत, गावामधे जरी आपण हुशार,उत्तम विद्यार्थी असलो तरी शहरातल्या गर्दी मध्ये गेल्याशिवाय आपल अस्तित्व समजत नसत तसच काही.

आपल्या मध्ये खूप मोठी ताकद आहे ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी. आपण मात्र तिथ पर्यंत पोहचण्याचा साधा विचार सुद्धा करत नसाल तर शेवटी आपण पण तो दुसरा गरुडच!

प्रयत्न करत रहा, यश निश्चित मिळेल. 

पण प्रयत्न करत असताना ध्येयाला आणि ध्येय साध्य झाल्यावर मदतीचा हात दिलेल्या लोकांना कधीच विसरू नका.

You can do it....



सुदन जाधव 

Thursday, January 6, 2022

इजिरा एक रहस्य...

      न ,वारा,पाऊस आणि निसर्गाच चक्र  हे कायम चालूच असत. निसर्गाच चाललेलं रोजच रुटीन यामुळेच पृथ्वी आजवर समर्थपणे उभी आहे.

     हे निसर्गाच जलचक्र चालू असताना कित्तेक मनमोहक तसेच भयानक दृश्य पाहावयास आपल्याला मिळतात. त्यामधे पाऊस, वीज, ओढे, नाले, नद्या आणि समुद्र...ईत्यादी याचे नवे रूप पाहायला मिळते. पाऊस पडत असताना होणारी वीज ही काही आपल्यासाठी नवीन नाही. दोन ढगांमध्ये विद्युत दाब तयार झाल्यास वीज तयार होऊन ती आकाशात सगळीकडे पसरते आणि चमकते. आणि जमीन आणि ढगांमध्ये विभावाअंतर तयार झाल्यास वीज खाली जमिनीवर कोसळते.

     पाऊस पडत असताना चमकणारी वीज किती प्रकाशमान असते आणि धडकी भरवते ते आपणास ठाऊक आहेच. जेव्हा वीज जमिनीवर पडते तेव्हा काही नुकसान करून जाते.  झाडावर, घरावर, प्राण्यांच्यावर, कधीकधी मोकळ्या रानात- माळावर.

     पण कधी- कधी पडणारी वीज आयुष्यभरासाठी एक चमत्कार घडवून जाते. हो आपण बरोबर वाचताय... आपण ऐकल असेल आपल्या आजी- आजोबा, पणजी- पणजोबा यांच्याकडून की तो खड्डा असा तयार झाला , तमुक तयार झाला.

     असच काही जेव्हा वीज जमिनीवर पडते, तेव्हा दगड फोडून खड्डा पडतो आणि दगडाला तडे जातात. आणि काही कालावधी नंतर तिथे पाणी पाझरायला लागते आणि लहान पाण्याचा डबका बनून जातो यालाच ग्रामीण भाषेत इजिरा म्हणतात. 

इजिरा ही एक नैसर्गिक देणगी आहे. या पाण्याचा वापर पूर्वापार पासून खूप लोकांसाठी अमृत म्हणून काम करत. वाटसरू ची तहान, गुरे राखणारे आणि त्यांच्या जनावरांना पाणी, रात्री च्या वेळेस भित्र्या प्राणांची  तहान सुद्धा हीच इजिरा भागवते.

आपण देखील आपल्या आसपास डोंगर, रानावनात असे कित्तेक पाण्याचे डबके पाहिले असणारच. काहीजण म्हणत पण असतील पहा, रामायणात रामाने मारलेला बाण ईथे लागला म्हणून पाणी लागल इथे, किंवा कृष्णाने मांडलेल्या खेळाने.

पण मित्रानो इजिरा हा विजेमुळे जमिनीवर तयार झालेला नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे. आपल्या आसपास असल्यास अवश्य भेट द्या आणि त्याचे संवर्धन करा.




-सुदन जाधव 

सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...