प्रत्येक देश हा आपल्या संस्कृती आणि सभ्यता यामुळे ओळखला जातो. त्याच प्रमाणे भारत देश हा सत्य, प्रामाणिकपणा, धार्मिकता, नैतिक मूल्ये आणि मानवतावादी या सर्वांमुळे जगप्रसिद्ध आहे.
परंतु आज भारत देशाला भ्रष्टाचार सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भ्रष्टाचार हा संपूर्ण जगाला आणि देशाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज बऱ्याच विकसित आणि विकसनशील देशांनी प्रगती केली आहे आणि करीतही आहेत.परंतु आजही कुठे ना कुठे तरी भ्रष्टाचार हा दिसून येतोच. भारताला काही वर्षांपूर्वी "सोनेकी चिडीया" अस संबोधलं जात होत पण आज याच भारतात भ्रष्टाचार आपली मूळ रोवून उभा आहे. आज भारत देशात अनेक लोक हे भ्रष्टाचारी बनले आहेत. भ्रष्टाचार हा देशाला किंवा समाजाला लागलेला एक मोठा कलंक आहे.
आपण रोज टीवीवर पाहतो,आज याची चोकशी होणार तर उद्या त्याची. आणि एकदाची का चौकशी सुरु झाली की तो त्याच नाव घेतो आणि हा त्याच. पण की काय म्हणतो...भाडखाऊ ,आता एकमेकांची नाव घेताय पण मलाई खाताना जनाची नाहितर मनाची तर लाज वाटत नव्हती का? आणि आता नाव घेतोयस म्हणजे तुझा हप्ता थांबला म्हण की....🤣🤣🤣
आता भ्रष्टाचार म्हणजे काय...?
भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे – भ्रष्ट + आचार. भ्रष्ट म्हणजे वाईट आणि आचार म्हणजे आचरण. जे असे आचरण असते जे नेत्यानी प्रकारचे अनैतिक आणि अयोग्य असते.
जेव्हा एखादी व्यक्ती न्याय व्यवस्थेच्या स्वीकारलेल्या नियमांच्या विरोधात जाऊन स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जे चुकीचे आचरण स्वीकारते त्याला भ्रष्टाचार असे म्हटले जाते.आताची सरकारी बांधकामं पाहिली तर अस वाटतय की, बांधकाम निधीमधला 5% जरी खर्च केला असता तरी शाबाशकीच प्रमाणपत्र मिळेल तुम्हाला जनतेकडून.
अहो उगीचच आपल्या पुर्वज्यानी बांधलेल्या इमारती अजुन दिमाखात उभ्या नाहित. फक्त सिमेंट मधे जान असुन काही फायदा नसतो साहेब, तेवढ इमान पहिजे की काम करणारयामध्ये.
आणि बांधकामाची शाश्वती कधीपर्यंत ...? जोपर्यंत चंद्र- सुर्य आणि पृथ्वी आहे तोपर्यंत... कळालच असेल मी कुणाबद्दल बोलतोय ते, स्वतची जमीन-लत्ता विकून आपल कार्य पुर्ण करणारे कुठे आणि आहे त्यातले तुझी टक्केवारी इतकी आणि माझी इतकी म्हणणारे आत्ताचे बोके कुठे.... नेता नेक होता त्यांचा🚩🚩🚩
भ्रष्टाचाराची कारणे काय असतील ....?
आपल्या भारत देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त आहे.
नोकरीचा अभाव,शिक्षणाचा अभाव,लोभ आणि असमानता,असमानतेमुळे, आर्थिक आणि सामाजिक स्थितीमुळे एखादा व्यक्ती हा भ्रष्टाचारी बनतो. आज माणसाच्या मनात स्वार्थीपणा हा वाढला आहे.
काही लोक हे इतके स्वार्थी झाले आहेत कि, त्यांना आपल्या नातेवाईकां आणि मित्रांपेक्षा जास्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते आपला स्वार्थ किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचार या मार्गाचा अवलंब करतात.
भ्रष्टाचार हा एक संसर्गजन्य रोगासारखा आहे. जर हा एखाद्या देशाला किंवा समाजाला लागला तर त्या देशाचे आणि समाजाचे संपूर्ण जीवन नष्ट करू शकतो.
भ्रष्टाचाराला रोकण्यासाठी समाजातील विविध स्तरांवर कडक कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने देशातील प्रत्येक बेरोजगार लोकांना रोजगार प्राप्त, शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
त्याच प्रमाणे देशात काळा पैसा वापरणाऱ्या लोकांवर कठोर कायदे केले पाहिजेत. जो पर्यंत हे थांबणार नाही तो पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्ती आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही.
-सुदन जाधव.