आदिमानवाने दोन पायांवर चालण्याचे तंत्र शिकून घेतल्याने माणसाच्या मेंदूचा विकास इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक झाला व मेंदूची रचना अधिक क्लिष्ट झाली, अनेक प्राणी हुशार असतात; पण माणूस सर्वांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला. मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. या बुद्धीमतेच्या जोरावर मानव चंद्रावर तर पोहचलाच पण आता मंगळावर सुद्धा पोहचण्याच्या तयारीत आहे.
पण याचा परिणाम थेट पर्यावरणावर होत आहे....पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबातील संख्या वाढू लागली की त्यांचे घर वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते.त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो.
आता राहिला प्रश्न तो जंगलात राहणार्या प्राण्यांचा....जंगलतोडीत कित्तेक पक्ष्यांची घरटी उध्वस्त झाली असतील. कित्येक प्राण्यांचा आसरा गेला,अन्न,सरक्षंण त्यांच्या जीवनावर तर मानवाने कुर्हाड चालवली.
वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर, जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, धोक्यात येत असलेला निवारा आदी कारणांमुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षात वाढ झाली आहे. स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना या वन्यप्राण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याला जबाबदार कोण? राजकीय पुढारी व सरकारी अधिकारी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या फोटो व प्रसिद्धीसाठी येतात. लागवड केलेल्या वृक्षांची कोणत्याही प्रकारे काळजी न घेतल्याने तसेच संवर्धनाचे कोणतेही नियोजन नसल्याने लागवड केलेल्या शंभर झाडांपैकी पाच झाडेही जगत नाहित.
शहरात राहणाऱ्या माणूस या प्राण्याला दुसऱ्या प्राण्यांना पहायची इच्छा झाली की त्याला प्राणिसंग्रहालयाचा रस्ता धरावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरून अवचित एखादा हत्ती दिसला की त्याचं मन हरखतं, पण आपल्या वस्तीत बिबट्या आला की मात्र भीतीने अक्षरश: गाळण उडते. 😀
उन्हाळयाचे ते दिवस आणि एके दिवशी जिल्ह्याच्या मध्यभागी एकाला बिबट्या दिसला. आणि म्हणता म्हणता वार्ता सगळीकडे पसरली ....पोलिस यंत्रना सज्ज झाल्या. कदाचीत तो(बिबट्या) घाबरलेला असावा त्यामूळे तो दिसेल त्या रस्त्याने पळत होता. त्यात त्याचा शिकार बनला तो एक कुत्रा ... बिचारा कुत्रा तो ही भर उन्हात सावलीच्या आडोशाला म्हणून निजलेला.
आतातर बिबट्याला पकडल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने पोलिसाना काही भाग बंद करावा लागला...तास- दोन- पाच तास उलटून गेले मात्र तो काही लावलेल्या जाळ्यात सापडेना.अखेर संध्याकाळी 10च्या सुमारास त्याला भुलिचे ईजेक्शन देऊन पकडन्यात यश आले. सकाळी 7 वा. पासुन ते रात्री 10वा.पर्यंत त्याला पकडेपर्यंत शहरवासीयांच्या जिवात जीव नव्ह्ता. शेवटी त्याला पकडन्यात यश आले आणि ते ही सही सलामत. तेव्हा समजले ती एक 3 वर्षाची मादी बिबट्या होती.
खरच कौतुकास्पद काम होत त्या टीमच... कारण तिला काहीही इजा न करता त्यानी तिला पकडले होते आणि यामुळेच का होईना सर्वाना याची ही खात्री झाली की तिला तिचे हरवलेले घर नक्की परत मिळेल.👌👌
पण मित्रानो खरच ते आपल्या शहरात येत आहेत की आपण त्याना तसे करण्यास भाग पडतोय .....?कदाचीत माझ्या या प्रश्नामूळे सगळे अनुत्तरीत राहतील...
आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवा.
सुदन जाधव.
Superb...
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
DeleteSuperb sir
Deletesuperb...आत्मचिंतन करायला लावणारे शब्द....
ReplyDeleteVery nice keep it up 👌 👌
ReplyDeleteखुप मस्त दादा.
ReplyDeleteVery nice 👌👌
Barobr sir hey sagale jungle thodi mulech होत आहे 💯🙏 nice blog😘
ReplyDelete