नमस्कार ...आज गुढीपाडवा त्यानिमित्ताने सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. गतवर्षी कोरोना विषाणू प्रार्दुभावामूळे कित्तेक कुटुंबाणी गुढीपाडवा सण साजरा केला नव्हता. आणि ज्यांनी साजरा केला असेल त्यांनी देवाकडे हेच साकडे घातले असेल की पुढच्या वर्षी गुढीपाडवा कोरोणामुक्तीनिशी साजरा होऊदे.
पण कल किसने देखा ...गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोरोना रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसतेय. त्यात महाराष्ट्रा सोबत देशातील इतर राज्येदेखील कोरोना उद्रेक रूग्णसंखेत खराब यादीमधे होतीच पण यावर्षी मात्र महाराष्ट्राचा आकडा काही खाली उतरताना दिसत नाही याउलट रूग्णसंख्या झपाट्याने वाढ़ताना दिसत आहे.
महाराष्ट्रात सगळीकडे कोरोनाने रौद्र रुप धारण केलेले दिसत आहे. त्यात आपण ऐकत आहोच कुठे बेड तर कुठे ऑक्सिजन अभावी कितितरी रूग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत तर कित्तेक लोक दिवसाकाठी मृत्युला कवटाळत आहेत.
एकंदरीत कोरोनाने महाराष्ट्राची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळेच परत एकदा महाराष्ट्र सरकारने कोरोनाची साखळी तोडायला "ब्रेक दी चेन" संकल्पना आणत महाराष्ट्रात कडक लॉकडाउन आज जाहिर केला आहे.
आजच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी याबद्दल फेसबुक लाइव द्वारे याची माहिती दिली. पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू राहिल अशी त्यावेळी त्यांनी माहिती दिली.
आता उरला प्रश्न तो या संचारबंदी दरम्यान काय चालू राहनार आणि काय बंद.....?
काय सुरु....?
या संचारबंदी दरम्यान रेल्वे,लोकल, बस सेवा,खत दुकाने,शीतगृहे,शेतीकामे औधोगिक क्षेत्रातील उधोगधंदे,पार्सल सेवा,बँका ,दूरसंचार,पेट्रोल पंप,कार्गो सेवा,मेडिकल आणि किराणा दुकाने इत्यादी चालू राहतील.
काय बंद....?
होटेल, रेस्टोरंट,बार ,चित्रपटघृह,शुटिंग आणि अनावश्यक फिरता येणार नाही.
हे असतानाच सरकारने एक महिना मोफत मिळनार याची घोषणा केली आहे. त्या खलील प्रमाणे...
शिवभोजन थाळी,परवानाधारक फेरीवाले,रिक्षावाले याना पांधराशे रूपये,7 कोटी लोकांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळेल.
तरी सर्वानी आपली तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी ही विनंती.
ही वेळ देखील निघुन जाईल.....🙏🙏🙏
-सुदन जाधव
Kup mast.
ReplyDeleteWell done ����
Thank you ...
ReplyDeleteMast
ReplyDeleteखूप सुंदर लेख 👌👌
ReplyDeleteNice 👍
ReplyDelete